छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत हे दुर्देव ; किशोर पिंगळे यांची जयंतीबाबतच्या नियमावलीवर जोरदार टीका
बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ 100 जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, आजघडीला राज्यात राजकीय मेळावे, नेत्यांचे वाढदिवस, आंदोलने मोर्चे सर्रासपणे सुरु आहेत. त्यावेळी कोरोनचा संसर्ग होत नाही का शिवजयंतीवरच निबर्ंध कशामुळे असा सवाल राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी उपस्थित केला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत हे दुर्देव आहे. शिवजयंतीबाबतच्या सर्व नियमावली रद्द कराव्यात अशी मागणी त्यांनी पत्रकान्वये केली आहे.
No comments