झोपेचे सोंग घेतलेल्या बीड नगरपालिकेला जागं करण्यासाठी हंडा बजाओ मोर्चा- रामहरी मेटे
बीड : नगरपालिका मागील 35 वर्षापासून क्षीरसगरांच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते. राज्यसरकार व केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येक वर्षी शेकडो कोटी रुपये विकासाच्या नावाखाली बीड शहरासाठी येत असतात. परंतु क्षीरसागर यांनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण करून बीड शहराचा विकास करण्या ऐवजी बीड शहराला भकास करण्याचे काम सर्वच क्षीरसागरांनी मिळून केलेले आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी, रस्ते चांगले करण्यासाठी, भूमिगत गटात योजनेसाठी स्वच्छतेसाठी घरकुलांसाठी शेकडो कोटीच्या योजना आलेल्या आहे.
परंतु क्षीरसागरांच्या घरातील भांडणामुळे आणि भ्रष्टाचाराच्या पैशाच्या वाटणीमुळे सदरील कामे वर्षानुवर्षे रखडलेले पाहायला मिळतात. आणि त्याचा त्रास बीडवासियांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे बीड शहराला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे काम या सर्व क्षीरसागरांनी मिळून काहीही केलेले नाही. त्यामुळे दिवसेदिवस बीडवासियांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणून, शिवसंग्राम ने वेळोवेळी आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीडवासियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.आणि यापुढेही करत राहू, म्हणून शिवसंग्राम ने रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून आंदोलन केले, उपोषणे केले स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतल्या, गटारी साफ केली, नदी साफ केली. असे कार्यक्रम सातत्याने शिवसंग्राम राबवत आहे. आज सुद्धा आणि पावसाळा संपल्यावर आता मुबलक पाणी असताना पण बीडवासियांना कुठे 15 दिवसांनी तर कुठे 10 दिवसांनी नगरपालिकेकडून पाणी मिळत आहे आता मुबलक पाणी असताना जर ही अवस्था आहे तर उन्हाळ्यात काय अवस्था बीड करांची होईल याचा विचार न केलेला बरा म्हणून पाणीप्रश्न बरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसंग्राम नी येत्या सोमवारी, 28 डिसेंबर 2020 स. 11:00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिके वर हंडा बजाओ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलना मध्ये सर्व बीडवाशीयांनी सहभागी व्हावे व क्षीरसागरांच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभाराला आळा घालावा असे आव्हान शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी केले आहे.
No comments