वटणवाडी गावात तिन महिन्या पासून अंधाराचे साम्राज्य !
रोहित्राच्या दुरुस्तीला सापडेना मुहूर्त; महावितरणचा भोंगळ कारभाराविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संताप
के. के. निकाळजे । आष्टी
वटणवाडी गावाला पुरवठा करणाऱ्या विजेच्या ट्रान्सफार्मर जळून बिघाड झाल्याने येथील जवळपास 158 कुटुंब हे तिन महिन्यापासून अंधारात आहे. या बिघडामुळे वटणवाडी येथील गावकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह घरगुती विद्युत प्रवाह बंद असून त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वीज कंपनीकडून याबाबत ३ आठवड्यापासून दुरुस्ती साठी रोहित्र खोलून नेले आहे मात्र अद्याप पर्यंत रोहित्र दुरुस्त करून लावण्यात आले नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील गावात विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. कोरोनामुळे सध्या शाळा आणि कॉलेज हे डिजिटल च्या माध्यमातून सुरू आहे मात्र येथील विद्यार्थ्यांना गेल्या तिन महिन्या पासून वीज नसल्याने यांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागत आहे. वीज कार्यान्वित नसल्याने विद्युत मोटारी, पाणीपुरवठा यासह पिठाच्या गिरण्या बंद असून दळणासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या 90 दिवसांपासून गाव पूर्ण अंधारात आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधारात जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला व महावितरणला यासंदर्भात माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहित्रात बिघाड झाल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला व महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रोहित्र दुरुस्ती करण्यासाठी ३ आठवड्या पासून नेलेले आहे मात्र अद्यापही ग्रामपंचायत व महावितरण कंपनी कडून याबाबत काहीही काम केलेले नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी जालिंदर नरवाडे यांनी व्यक्त केली.
No comments